नाशिक (प्रतिनिधी) खरीप हंगामासाठी विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्यावर्षी पेक्षा दहा टक्के अधिक पीक कर्जाचे वाटप झाले आहे. आजपर्यंत ४ हजार ४४८ कोटी ८९ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप २२ जुलै २०२१ पर्यंत झाले आहे. विभागात एकूण ४७ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ विभागातील ४ लाख ९५ हजार ६०० शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी दिली आहे.
खरीप हंगाम २०२०-२१ करिता विभागातील एकूण उद्दीष्टे ९ हजार ३९६ कोटी ५६ लाखाचे असून त्यापैकी ४ हजार ४४८ कोटी ८९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. संपूर्ण विभागात आत्तापर्यंत ४७ टक्क्यापर्यंत कर्जवाटपाचे काम झाले आहे. कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बँकेने ८२ टक्के इतके लक्षणीय असे कर्ज वाटप केले आहे, अशी माहितीही विभागीय सहनिबंधक श्रीमती लाठकर यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात ७३ हजार २३० शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप
नाशिक जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे २ हजार ७८० कोटी रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत १ हजार २४२ कोटी ३५ लाख रुपयांचे वाटप झाले असून आत्तापर्यंत ४५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ ७३ हजार २३० शेतकऱ्यांना झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात २ लाख २३ हजार ४९३ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप
अहमदनगर जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे ३ हजार ७५३ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत १ हजार ८७४ कोटी २७ लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत ५० टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ २ लाख २३ हजार ४९३ शेतकऱ्यांना झाला आहे.
धुळे जिल्ह्यात ३० हजार ५८६ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप
धुळे जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे ६८४ कोटी ९९ लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत २८६ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले असून आत्तापर्यंत ४२ टक्के पीक कर्जाचे वाटप झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ ३० हजार ५८६ शेतकऱ्यांना झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात १ लाख ४८ हजार ६३० शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप
जळगाव जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे १ हजार ६१४ कोटी ०९ लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत ८१५ कोटी १४ लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत ५१ टक्के झाले आहे. या पीक कर्जाचा लाभ १ लाख ४८ हजार ६३० शेतकऱ्यांना झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात १९ हजार ६६१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप
नंदुरबार जिल्ह्याला खरीप पीक कर्जाचे ५६३ कोटी ५६ लाख रुपयांचे उद्दीष्टे देण्यात आले होते. त्यापैकी आत्तापर्यंत २३० कोटी ९४ लाख रुपयांचे वाटप झाले असून पीक कर्ज वाटपाचे काम आत्तापर्यंत ४१ टक्के झाले आहे. पीक कर्जाचा लाभ १९ हजार ६६१ शेतकऱ्यांना झाला आहे.