अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील हिराबाई मोतीलाल भिल ही महिला ३१ मे रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास जीर्ण झालेल्या सार्वजनिक शौचालयात शौचास गेल्या असता भींत पडून जागीच ठार झाल्या होत्या. त्यांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ४ लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
आज अमळनेर येथे आमदार अनिल भाईदास पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, नायब तहसीलदार योगेश पवार, सभापती श्याम अहिरे, प.स.सदस्य प्रविण पाटील, डॉ.रामराव पाटील, कळमसरे येथील सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत, नगरसेवक दीपक पाटील, रा.यु. काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, माजी नगरसेवक भाईदास महाजन, दिनेश पाटील आदिंच्या उपस्थितीत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मयत हिराबाई भील यांचे पती मोतीलाल भील यांना चार लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. आमदार अनिल पाटील यांनी याकामी या कुटुंबाला पाठपुरावा करुण मदत मिळवून दिल्याने मोतीलाल भील व त्यांच्या परिवाराने आमदार अनिल पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ तसेच स्थानिक प्रशासनाचे आभार मानले.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मदत
यावेळी तालुक्यातील आशा बापू भिल (मांडळ), कविता सुक्रम वंजारी (डांगर), कन्हैयालाल काशीनाथ पाटील (वासरे), सुरेखा शाम कोळी (अमळगाव), कमला राजेंद्र भिल (शिरूड), शोभा ज्ञानेश्वर पाटील (अमळनेर), मंगलबाई सजन पाटील (खडके), जनाबाई शांताराम मोरे (अमळगाव), अलका अशोक मोरे (पातोंडा), अनिताबाई ईश्वर पाटील (मुंगसे) मयतांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजारांचे धनादेश आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाठपुराव्याने सुपूर्द करून वारसांना आर्थिक मदत कारण्यात आली.