लातूर (वृत्तसंस्था) मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली (Latur Road Accident)
या अपघातात भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे, लता भगवान सावळे, राजकुमार सुधाकर सावळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे ..तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. निलंगा ते औराद महामार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असणारी कार पटली झाली. या अपघातात सावळे परिवारातील चार जणांचा जागीच मृत्यू (Accident Death) झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भिषण होता की कार पलटी होऊन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडली. यामुळे कारचा चक्काचूर झाला. अपघातातील लोक हे चाकूर येथील रहिवासी आहेत. मुलीच्या बोहल्यावर चढण्याची स्वप्न पाहणाऱ्या आई वडिलांसह कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.