धरणगाव (प्रतिनिधी) – शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरीमातेच्या मंदिरापर्यंत काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून काही दिवसात रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार आहे. मोरया परिसरातील नागरिकांची अनेक दिवसापासून ची मागणी पूर्ण होणार आहे. या रस्त्यामुळे बालकवी ठोंबरे शाळा, रेल्वे स्टेशन, स्वामी समर्थ केंद्र, चिंतामण मोरया मंदिर या ठिकाणी जाणारे भाविक आणि विद्यार्थी यांचे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हाल होत होते.या होणाऱ्या रस्त्यामुळे चिंतामण मोरया परिसरातील नागरिक खूप मोठ्या समस्येतून समस्या मुक्त होणार आहेत तसेच धरणगाव शहरातील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातील गर्दीमुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांना गर्दीतून वाहन काढताना होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यामुळे या कामाकरिता निधी उपलब्ध करून प्रयत्न करणारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील आणि रस्त्याच्या कामात जातीने लक्ष घालणारे युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे शहरातील आणि परिसरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले.अनेक दिवसांपासूनची या रस्त्याची मागणी आता पूर्णत्वास येणार आहे.













