मुंबई (वृत्तसंस्था) गोरेगाव परिसरात समर्थ नावाच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पहाटे ३ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू तर ५८ जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती. ही आग लेवल दोन प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे तर 58 जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे.
या आगीत ५० बाईक आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आली असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील अधिष्ठांतावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल झाला असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेन, असाही निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप उघड झाले नाही. पण प्राथामिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे.