जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तुकाराम वाडी व दशरथ नगर परिसरात अनेक घरांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तुकाराम वाडी व दशरथ नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील तुकाराम वाडी व दशरथ नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 15 ते 20 जणांच्या टोळक्याने अनेक घरांवर दगडफेक केली असून चार चाकीसह दुचाकीचीही तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 15 ते 20 टोळक्याने धारदार शस्त्रासह घरांवर हल्ला चढवण्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला असून या घटनेचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेमुळे तुकाराम वाडीसह दशरथ नगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.