TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या चौधरी कुटूंबाला ठाकरे परिवाराकडून निष्ठेची भेट

युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निलेश चौधरी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) : शिवसेना आणि ठाकरे परिवारावरील निष्ठेचे फळ आज धरणगावच्या उद्योगपती सुरेश चौधरी यांच्या कुटुंबियांना मिळाले. राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर सुद्धा चौधरी कुटूंबियांची ठाकरे घराण्यावरील निष्ठा कायम आहे. परिणामी सुरेश चौधरी यांचे पुत्र आणि धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांची युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी आज नियुक्ती करण्यात आली.

जिल्ह्यात शिवसेना आणि सुरेश चौधरी यांचे अतूट नाते सर्वश्रुत आहे. सध्याचे पालकमंत्री यांच्या चार विजयात सुरेश चौधरी यांचा सहभाग गुलाबराव पाटील सुद्धा नाकारू शकत नाही. म्हणूनच शिवसेनेतील बंडा नंतर सुरेश चौधरी आणि निलेश चौधरी या पितापुत्रांच्या भूमिकेमुळे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, चौधरी कुटुंबीयांनी नम्रपणे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि पालकमंत्र्याच्या मतदार संघातच निष्ठावान शिवसैनिकांची मोट बांधली. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या सोबत प्रत्येक गावात संपर्क सुरु केला. परिणामी मंत्री गुलाबरावांच्या जाण्या नंतरही मतदारसंघात शिवसेनेची ताकद तसूभरही कमी झाली नाही. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या धरणगाव येथील ऐतिहासिक सभेमुळे निलेश चौधरी यांचे संघटन कौशल्य सिद्ध झाले. परिणामी निलेश चौधरी यांना बळ देण्याचे मातोश्रीवरच ठरले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दूरध्वनीवरून निलेश चौधरी यांना थेट मातोश्रीवर पाचारण केले. दोन दिवसांपूर्वीच निलेश चौधरी यांनी मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. याच भेटीत युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई, विस्तारक चैतन्य बनसोडे यांनी काही तरी मोठी जबाबदारी सांभाळण्याची तयारी ठेवा असे संकेत त्यांना दिले आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त जाहीर करण्यात आली. यात निलेश चौधरी यांची युवासेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली. जळगाव ग्रामीण, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा या तालुक्यांची जबाबदारी निलेश चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
निलेश चौधरी यांनी अतिशय कमी वयात राजकारणात यश संपादन केले आहे. शिवाय, सेनेतील दोन बंडाळी त्यांनी अनुभल्या आहेत. या आधी २००५ मध्ये राज ठाकरे यांनी बंड केलं तेव्हा निलेश चौधरी यांच्या खांद्यावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या तालुकाप्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली होते. या संधीच सोन करत निलेश चौधरी यांनी तेव्हा प्रथमच महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधीपदी बीव्हीएसचा झेंडा फडकविला होता. यानंतर दहा वर्ष त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सहकाराचा अभ्यास केला आणि नंतर आपला मोर्चा उद्योगाकडे वळविला. २०२० मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवारी करून निलेश चौधरी यांनी नगराध्यक्षपद काबीज केले. नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आणि दोन महिन्यांत कोरोनाच संकट आलं. मात्र, न डगमगता निलेश चौधरी यांनी कोरोना काळात धरणगावकरांची घेतलेली काळजी कौतुकास्पद ठरली. ठाकरे कुटुंब आमचे दैवत आहे. कोणत्याही लाभासाठी नव्हे तर दैवताचे पावित्र्य जपण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे निलेश चौधरी यांनी सांगितले. कुणाशी विरोधाला विरोध आपण करणार नाही. मात्र, शिवसेनेचे संघटन मजबूत करून जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकविण्यासाठी आपण तन, मन आणि धन अर्पण करून काम करणार असल्याचा संकल्पही निलेश चौधरी यांनी बोलून दाखविला.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

सार्वजनिक जागी अश्लील शिवीगाळ ; पारोळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन ; पहूर कसबे येथील ग्रामस्थांचा इशारा !

August 30, 2024

बोअरवेलच्या ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला ; दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू, दोन जखमी !

January 31, 2024

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी !

November 16, 2022

धरणगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group