जळगाव (प्रतिनिधी) पाळधी दुरक्षेत्र पोलिस स्टेशन मंजुर असुन नविन पोलिस चौकी बांधणे व स्टाॅप वाढवणे व नविन वाहणे मिळावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अरविंद मानकरी यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना नुकतेच दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पाळधी क्षेत्र पोलिस स्टेशन असून त्या दूरक्षेत्राशी जागा हि पुरेसी नसुन सदर नविन पोलिस चौकी व पोलिस स्टॉफ वाढवण्यात यावा व नविन वाहन पोलिस स्टेशनला उपलब्ध व्हावे. तरी पाळधी दुरक्षेत्र पोलिस हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ याचे हृद १४ कि.मी. असुन या हद्दीत एकुण २७ गांवे येत असून या गावांपैकी बांभोरी व बांभोरीलगत १ विद्यापीठ, ३ इंजिनीअरींग कॉलेज २ मोठ्या कंपन्या असल्याने पोलिस स्टॉफ पुरेसा होत नसल्याने पोलिस प्रशासनावर अतिशय ताण येत असतो, तरी सध्या परिस्थीतीत पाळधी दूरक्षेत्र पोलिस स्टेशनला १ ऐपीआय १० पोलिस अंमलदार असुन १ वाहन चालक आहे. सदर या दूरक्षेत्रची हद्द व लोकसंख्येचा विचार करता सदरचा स्टॉफ पुरेसा नाही तरी सदर पोलिस स्टॉफ व नविन पोलिस चौकी व नविन वाहन उपलब्ध करण्यात यावे, असे यात म्हटले आहे.
निवेदन देतांना जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, जिल्हाध्यक्ष अॅड. रविन्द्र पाटील, शिवराज पाटील, सम्राट पाटील आदी उपस्थित होते.