TheClearNews.Com
Friday, November 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना योध्यांच्या विम्यासाठी औरंगाबाद खंडपिठात “जनहित याचिका” दाखल करावी ; डॉ. नी.तू पाटील यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2021
in आरोग्य, कोर्ट, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कोरोना योद्ध्यांच्या वारसांना विमा कवचाचा लाभ मिळावा, अशी जनहित याचिका औरंगाबाद खंडपिठात दाखल करून योग्य ती कारवाई करावी, तसेच महाराष्ट्र शासनाला आणि विमा कंपनीला “प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमावा”, असे निर्देश शहीद कोरोना योद्ध्यांचा समर्थनार्थ द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका डॉ. नी.तू पाटील यांनी औरंगाबात खंडपीठातील केली आहे.

डॉ. निलेश तुकाराम पाटील यांनी औरंगाबात खंडपीठातील मुख्य न्यायधीश यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, माझा वैद्यकीय व्यवसाय असून वरणगाव याठिकाणी माझा डोळ्यांचा दवाखाना आहे. कोरोना महामारीमध्ये मी तन, मन आणि धनाने कोरोना रुग्णांची सेवा करत असून जनजागृती पर लेख सोशल मेडीयावर लिहित असतो. सदर कार्य करत असतांना केंद्र (प्रधानमंत्री जनआरोग्य कल्याण अंतर्गत) आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या सर्व प्रमाणित कोरोना योध्यासाठी, कोरोना कार्यकाळात कोरोना रुग्णाची सेवा करत असतांना कोरोना संक्रमित होऊन उपचाराअंती मयत झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. आणि आता या योजनेला दि. २८ एप्रिल २०२१च्या पत्रानुसार पुढील १८० दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.

READ ALSO

महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा संदेश

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

महोदय, माझा मुद्दा असा आहे की, जे जे कोरोना योध्या मागील पहिल्या लाटेमध्ये आपले कर्तव्य बजावतांना मयत झाले त्यांचे अजूनही एक वर्ष होत आले तरी प्रस्ताव मंजूर नाहीत, प्रलंबित आहेत. असे काही प्रस्ताव तयार करण्यासाठी मी स्वत:हा मदत केली होती.

१. कै. प्रकाश करणसिंग तुरकुले, स्वच्छता कर्मचारी भुसावळ नगरपरिषद, यांचा मृत्यू दि. १२ जुन २०२० ला झाला असून प्रस्तावामध्ये अजूनही कागदपत्रे यांची मागणी होत आहे.

२. कै. सुरेश केशव शेळके, कर्मचारी वरणगाव नगरपरिषद, यांचा मृत्यू दि. ८ ऑगस्ट २०२० झाला असून प्रस्ताव दि. १४ ऑगस्ट २०२० ला पाठवला असून त्यांच्या बाबत पण तेच …!

३. कै. चंद्रभान काशीराम भोई, कर्मचारी, उपजिल्हारुग्णालय मुक्ताई नगर, यांचा मृत्यू दि. ११ जून २०२० झाला असून प्रस्ताव २१ ऑक्टोबर २०२१ ला पाठवला असून त्यांच्या बाबत पण तेच …!

महोदय, आता हे प्रस्ताव त्यांच्या कार्य ठिकाणावरून, जळगाव, नाशिक, मुंबई पुणे, नागपूर येथील ‘दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड’ यांच्याद्वारे सेटल केले जातात. पण काही कागदपत्रे कमी राहिल्यास परत परतीचा प्रवास सुरु होतो. या सर्व प्रक्रियेला प्रत्येक स्तरांवरील अधिकारी जबाबदार असून शासकीय दिरंगाई दिसून येते. कुठेतरी शासनाला मयत कोरोना योध्या व परिवार याविषयी असंवेदना दिसून येत आहे. वरील ३ नावे ही माझ्या माहिती मधील असून संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थीचा विचार करता सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. महोदय माझी एकच मागणी असून त्यासाठी आपण हि जनहित याचिका दाखल करावी.

सर्व कोरोना विमा कवच हे ‘दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड’ यांच्याद्वारे सेटल/पास होत असून मयत कोरोना योद्ध्यांच्या वारसांना लवकरात लवकर विमा कवचाचा लाभ मिळावा, त्यांचा मानसिक त्रास कमी व्हावा, तसेच सर्वांचा वेळ आणि पैसे वाचावे म्हणून सदर कंपनीद्वारे “प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमावा” जो हेच कार्य पार पाडेल आणि काही अपूर्णता असल्यास लगेच पूर्तता करण्यात येईल. त्यानंतरच सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी पुढे पाठवावे, यामुळे वेळ, शाररीक श्रम, आणि पैसा तर वाचेलच पण मयत कुटुंबियांना पण मानसिक दिलासा मिळेल.

महोदय, सदर जनहीतार्थे मागणीचा विचार करता, हि जनहित याचिका दाखल करावी, यावर योग्य ती कारवाई करावी आणि तसे महाराष्ट्र शासनाला आणि सदर विमा कंपनीला “प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमावा” असे निर्देश शहीद कोरोना योध्या यांच्या समर्थनार्थ द्यावेत, असे निवेदनात म्हंटले आहे.

प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमावा

यासाठी ऑनलाइन जनहित याचिका ई-मेलमुंबई/औरंगाबाद खंडपीठात केली आहे. शिवाय आज सर्व कागदपत्रे स्पीडपोस्टने पण पाठवणार आहे. ही मागणी मान्य झाल्यास महाराष्ट्रामधील तमाम कोरोना योद्धा यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर होतील आणि त्यामुळे परिवाराला आर्थिक दिलासा मिळेल शिवाय कार्यरत कोरोना योध्याचं मनोबल वाढेल, असे भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी.तू पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा संदेश

November 13, 2025
गुन्हे

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

November 1, 2025
गुन्हे

शाळेच्या मैदानात हाणामारी, चाकूहल्ला; चौघे तरुण गंभीर

September 19, 2025
गुन्हे

कौटुंबिक वादातून मामे सासऱ्याची चाकूने हल्ला करून केली हत्या

September 14, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
भुसावळ

एकत्र कुटुंब पद्धती ही काळाची गरज, प्रा.श्रीराम महाजन

August 25, 2025
Next Post

देशात जुलैपर्यंत लसींचा तुटवडा जाणवेल : अदर पुनावाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र रचून १२ आमदारांना निलंबित केलं : आशिष शेलारांचा आरोप

July 5, 2021

बर्ड फ्ल्यूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 12, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर !

October 30, 2022

सी.ए. इंटरमिजिएट परिक्षेत राधेय पाटीलचे यश !

July 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group