भुसावळ (प्रतिनिधी) उर्जाक्षेत्र वाचवण्यासाठी तसेच ग्राहक हितासाठी संघर्ष कृती समितीने दोन दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. यात भुसावळ विभागातील संघर्ष समितीतील सहभागी संघटनांचे सुमारे १५०० सभासद संपात उतरले आहे. दरम्यान, प्रशासनाने याची दखल न घेतल्यास संघर्ष कृती समिती आपले आंदोलन येता काळात अधिक तीव्र स्वरुपात करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वीज अधिकारी, कर्मचारी अभियंते कामगार व बाह्यस्त्रोत कामगार संघटना यांच्या संघर्ष कृती समिती मार्फत मागील दीड महिन्यापूर्वी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण तसेच ऊर्जा खाते महाराष्ट्र राज्य याना देण्यात आलेल्या आंदोलनाच्या नोटीस नुसार दिनांक १६.०२.२०२२ पासुन सनदशीर मार्गाने पुकारलेल्या आंदोलनाची शासन तसेच प्रशासनाने कुठल्याही स्तरावर दखल न घेतल्यामुळे तीनही कंपन्यानमधील मान्याता प्राप्त २६ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना व १२ बायस्त्रोत कंत्राटी कामगाराच्या संघटना यांनी एकत्र मिळुन शासन तसेच प्रशासनाचा खालील प्रमाणे लादण्यात आलेल्या अन्यायकारक बाबी जसे १) सुधारित विद्युत कायदा २०२९ ची अमलबजावणी करण्याबाबत चा हट्ट २) विद्युत क्षेत्राचे खासगीकरण करुन सामान्य जनतेचा पैश्यातून तसेच कर्मचाऱ्यांच्या परीश्रमातून उभारलेली अनमोल यंत्रणा कवडीमोल भावात खासगी भांडवलदारांच्या घशात घालणे ३) अतिशय उत्कृष्ट व उच्च महसूल देणारी महावितरण कंपनी मधील १६ शहरे परवाना तत्वावर खासगी भांडवलदारांना बहाल करणे ४) कामगार संघटनांना विश्वासात न घेता होल्डिंग कंपनी मार्फत बदली धोरण व त्याप्रमाणे इतर असे अनेक चुकीचे धोरण एकतर्फी पणाने लागू करणे ५) अत्यल्प दारात विद्युत निर्मिती करणारे जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती तसेच शासनाचे ताब्यात काढून खासगी भांडवलदारांच्या ताब्यात देणे. अश्या चुकीच्या धोरणांना आळा घाल्यासाठी त्याच सोबत बाहयस्त्रोत कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षा पर्यंत नोकरीची शाश्वती देणे व त्यासोबत वीज क्षेत्रातील सर्व कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, यासाठी दि. ०९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्रातील संघर्ष समितीचे सुमारे ३५-४० हजार घटक संघटनेतील सभासदांच्या उपस्थितीत मुंबई येथे आजाद मैदानावर जोरदार निदर्शने करून सुद्धा शासन प्रशासनाने त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे नाइलाजास्त्व उर्जाक्षेत्र वाचवण्यासाठी तसेच ग्राहक हितासाठी नाइलाजास्त्व संघर्ष कृती समिती आंदोलनाच्या नोटीस मध्ये नमुद केल्यानुसार सर्व संघटनांनी दि. २८ मार्च २०२२ च्या ००.०० वाजे पासून दिनांक २९ मार्च २०२२ च्या २४.०० वाजे पर्यंत (एकुण २ दिवस) लाक्षणिक संप पुकारलेला असून त्यात भुसावळ विभागातील संघर्ष समितीतील सहभागी संघटनांचे सुमारे १५०० सभासद संपात उतरलेले असुन जर या २ दिवसाच्या संपाची सुद्धा शासन किव्हा प्रशासन यांनी दखल न घेतल्यास संघर्ष कृती समिती आपले आंदोलन येता काळात अधिक तीव्र स्वरुपात करणार असून त्यामुळे ग्राहक सेवा विस्कळीत होणे, औद्योगिक शांतता भंग पावणे किव्हा कायदा सुवस्थेचा प्रश्न उदभवल्यास त्यासाठी शासन तसेच प्रशासन जबाबदार राहतील. याची शासनानी तसेच प्रशासनानी कृपया नोंद घ्यावी.