मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला पर्यावरणवादी आहे. सोशल मीडियावरच्या तिच्या अनेक पोस्ट याचा पुरावा आहे. आता तिने थेट भारतात ‘५ जी’ टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज (३१ मे) तिच्या या याचिकेवर पहिली सुनावणी होणार आहे.
टेलिकम्युनिकेशन उद्योग भारतात ‘५ जी’ तंत्रज्ञान आणण्याची तयारी करत आहे, त्यामुळे पृथ्वीवर कोणताही मनुष्य, प्राणी, पक्षी आरोग्यदायी जीवन जगू शकणार नाहीत. आजच्या तुलनेत आरएफ रेडिएशन १०-१०० पट वाढेल. या ‘५ जी’ तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या इकोसिस्टमचा मानवी जीवनावरही वाईट परिणाम होईल, असे यात म्हटले आहे. जुही स्वतः पर्यावरणाविषयी अतिशय जागरूक आहे. ती सध्या मुंबईपासून जवल्न असलेल्या एका ठिकाणी ऑर्गेनिक शेती करत आहे. अभ्यास आणि वैद्यकीय पुराव्यांनुसार यामुळे बरेच लोक आजारी पडले आहेत. तर बर्याच लोकांचे डीएनए, सेल्स आणि ऑनगोन सिस्टमचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे बरेच मोठे रोग देखील होऊ शकतात.
जूही चावलाचे प्रवक्ते यांनी शेअर केलेल्या निवेदनामध्ये, ते दाखल करत असलेल्या केस विषयी सांगताना म्हणाले की, याप्रकरणी कोर्टाचे लक्ष या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधले जावे हे यामागचे उद्देश्य आहे. जेणेकरुन ते आहे सिद्ध करू शकतील की, ‘५ जी’ तंत्रज्ञान मनुष्य, प्राणी आणि पक्ष्यांसाठी किती सुरक्षित आहे. त्यांनी यावर संशोधन केले पाहिजे आणि त्यानंतरच ‘५ जी’ तंत्रज्ञान भारतात येणे सुरक्षित असेल की, नाही हे ठरवले पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊनच त्यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा.