चोपडा (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यात मराठा समाजातील आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध करीत अडावद येथील मराठा समाज बांधवांनी नुकतेच अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील अडावद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सब यार्डा समोर रास्तारोको आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी घोषणांबाजी केली.
दि. ८ रोजी सकाळी १० वाजता मराठा समाज बांधवांनी केलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागली होती. यावेळी चोसाका संचालक दिनकर देशमुख, चंद्रकांत पाटील, हरिष पाटील, माजी सभापती डि.पी. साळुंके, राजेश देशमुख, लक्ष्मण पाटील, श्रीकांत दहाड, अनिल देशमुख, भुषण देशमुख, पप्पु मंगरुळकर, देविदास पाटील, पंकज देशमुख, वजाहतअली काझी, हाफीज मलक, किशोर देशमुख, शांताराम पवार, किशोर सोनवणे, नवल चव्हाण, सचिन महाजन, पंढरीनाथ पाटील,संजय देशमुख, शरद पाटील यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी व मराठा समाज बांधव उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, पोउनि जगदिश कोळंबे, नासिर तडवी, सतिष भोई, मुकेश तडवी, विनोद धनगर, सुनिल तायडे, ज्ञानेश्वर सपकाळे यासह मोठा पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला होता.
















