जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वाटिकाआश्रम येथे झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याची घटना शनीवारी घडली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील वाटिकाआश्रम येथे भरधाव कारच्या धडकेत अजबसिंग पाटील या वृध्दाचा मृत्यू झाला होता. ची घटना शनिवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडली. दोन दिवसांपूर्वी देखील याच पद्धतीने भरदार ट्रकने दोन महिलांना चिरडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर येथील परिसरातील संतप्त नागरिकांनी दुपारी २ वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रात्री 10 वाजता पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जमावातील ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.