उत्तराखंड (वृत्तसंस्था) उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने धरणाचा बांध तुटला आहे. राज्याच्या चमोलीमध्ये ही घटना घडली. यामुळे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्याच्या रैणी गावाजवळ धरणाचा बांध फुटला. प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या दुर्घटनेत अनेक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १५० ते २०० जण बेपत्ता असल्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे.
आज सकाळी १०.५५ वाजता ही दुर्घटना घडली. हिमकडा कोसळल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरामुळे धरणाचा बांध तुटला आहे. यामुळे या ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. अनेक घरे आणि माणसे वाहून गेले असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला आहे. या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी जोशीमठमध्ये हिमकडा कोसळल्याने पाण्याच्या वेगवान प्रवाहाने वाटेत आलेल्या दोन प्रकल्पांवर अनेक लोक काम करत होते. तपोवन रैणी परिसरात हिमकडा तुलटी यामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टला मोठी हानी झाली आहे. नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे अलकनंदा नदीच्या किनारी असलेल्यांनी लवकरात लवकर दुसरीकडे शिफ्ट व्हावे असे आवाहन चमोली पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चमोली जिल्ह्यातमध्ये ही दुर्घटना घडली असल्याचे वृत्त आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्कालीन विभागांना आपत्ती निवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खबरादारीचे सर्व उपाय केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.