मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज कोर्टातर्फे फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामींना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
अर्णब यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिलेत.
अर्णब गोस्वामी यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आज कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णब यांना जामीन देण्यास नकार दिला.