धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भामर्डी गावाच्या सरपंचावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच पैकी चार संशयितांना अटक केलीय. दगडु लहु पाथरवट (शिलावट) (वय ४८, सरपंच रा. भामर्डी), असे जखमी सरपंचाचे नाव आहे.
दि. १६ एप्रिल रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान, १) समाधान दशरथ वानखेडे, २) जनार्धन राजधर पाटील, ३) संजय त्र्यंबक पाटील, ४) प्रकाश पंडीत पाटील, ५) रविद्र विधन पाटील (सर्वरा.भामर्डी ता. धरणगाव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सरपंच दगडु लहु पाथरवट (शिलावट) यांना गावात पाणी न सोडण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान केली. तर संशयित प्रकाश पाटील रवींद्र पाटील यांनी सरपंचला जास्त माज आला आहे. याला आज जिवंत सोडायचा नाही. याच्यामुळे माझा भाऊ गोपाल पाटील हा निवडणुकीत पराभूत आहे. याला आज सोडायच नाही, अशी धमकी देत समाधान वानखेडे याने त्याच्या हातातील काहीतरी धारदार शस्त्राने पाठीत मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाउ पाटील हे करीत आहेत.