जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भादली गावात राहणाऱ्या एका तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री भादली रेल्वेस्थानक परिसरात घडली. कल्पेश चंद्रकांत नारखेडे (वय,२६) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सोमवारी रात्री कल्पेश हा दि. १६ रोजी काही मित्रांसोबत भादली परिसरात शेतात पार्टीसाठी गेला होता. परंतू काही वेळाने तो एकटाच तेथून निघून गेला. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास कल्पेशने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती उघडकीस आली. आत्महत्येच्या मागचे कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी व भादलीच्या पोलिस पाटील अॅड. राधीका ढाके घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.