पुणे (वृत्तसंस्था) पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) भरधाव कारनं मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय. या अपघातात कारमधील चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. शिवम राहुल कोकाटे, प्रियम सत्येंद्र राठी, हृषीकेश मनोज शिंदे आणि मोहनीश संगम विश्वकर्मा अशी मृतांची नावे शिरगाव पोलिसांनी सांगितली आहेत.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पालक किंवा अन्य नातेवाईक त्यांच्या सहलीच्या प्लॅनबाबत अजिबात माहित नव्हते. शिरगाव पोलीस चौकीतील उपनिरीक्षक बळवंत गावित यांनी सांगितले आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी बोललो आणि ते कुठे आणि कोणत्या कारणासाठी जात आहेत. याची माहिती त्यांच्या पालकांना किंवा इतर नातेवाईकांना मृत विद्यार्थ्यांनी दिली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संशयास्पद आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर अधिक माहिती बाहेर येईल असंही त्यांनी सांगितलं.
शिवम राहुल कोकाटे (१९) सदाशिव पेठ, प्रियम सत्येंद्र राठी (२०) नारायण पेठ, हृषिकेश मनोज शिंदे (२१) रा. बिबवेवाडी आणि मोहनीश संगम विश्वकर्मा (२०) धनकवडी हे चार विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. दुपारी 3.30 च्या सुमारास द्रुतगती मार्गावरील गहुंजे गावात थांबलेल्या ट्रकला कारने धडक दिली. या अपघातात या सर्वांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हृषिकेश मनोज शिंदे, ज्यांच्या वडिलांची कार आहे, शिंदे ती चालवत होता. तो सगळे टिळक रोडवरील महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे. तर इतर तिघे डेक्कनमधील कर्वे रोडवरील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
गाडीवरील नियत्रंण सुटल्याने अपघात झाला
अपघात झालेला ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात होता. त्यात तांत्रिक बिघाड झाला. ट्रक चालकाने वाहन सर्व्हिस लेनच्या अगदी टोकाला खेचले आणि तिथे थांबवले होते. ट्रक थांबवताना त्याने पुरेशी खबरदारी घेतली होती. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे हा अपघात झाला आहे. त्यानंतर ती सर्व्हिस लेनमध्ये जाऊन थांबलेल्या ट्रकवर आदळली आहे.