नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नेपाळमधील दोती जिल्ह्यात बुधवारी पहाटे 6.3 तीव्रतेच्या भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. या घटनेत एक घर कोसळून जवळपास सहा जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर, बुधवारी रात्री दोनच्या सुमारास दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, 9 नोव्हेंबर रोजी रात्री 1:57 च्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र मणिपूर, नेपाळ येथे होते. त्याची खोली जमिनीच्या खाली 10 किमी होती. या भूकंपात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नेपाळच्या लष्कराकडून बचावकार्य केले जात आहे. या भूकंपात अनेक घरेदेखील जमीनदोस्त झाली आहेत. या भूकंपाचे धक्के रात्री २ वाजता राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही जाणवले. येथे रात्री २ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले.
एनसीएसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊसह अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये 8 नोव्हेंबरला 9.41 वाजता आणि 8.52 वाजता भूकंप झाला होता. त्यांची तीव्रता 5 पेक्षा कमी होती. दरम्यान, भूकंपानंतर अर्ध्या तासात #earthquake 20,000 ट्विटसह ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. एवढा जोरदार भूकंप कधीच जाणवला नसल्याचे ट्विट काही लोकांनी केले.