मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपाचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) रेवदंडा पोलीस ठाण्यात (Revdanda Police Station) पोहचले आहेत.
नेमकी काय आहे तक्रार ?
रश्मी उद्धव ठाकरे यांच्या कोर्लई गावातील १९ बंगल्यांची कागदपत्रं देत आहोत. (Rashmi Thackeray 19 Bunglow Case) आम्हाला आतापर्यंत हे बंगले तिथे आहेत, असं सांगण्यात येत होतं. लेखी उत्तरं सुद्धा तशीच होती. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर बंगले नाहीत, असं सांगण्यात येतं आहे. सदर जागेवरील बंगलोचं काय झालं याची चौकशी करावी, विनंती”, अशा आशयाची तक्रार किरीट सोमय्यांनी पोलिसांना दिली आहे. यावर आमदार प्रशांत ठाकूर, महेश भोसले यांनीही सह्या केल्या होत्या. तसेच रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी आम्ही करणार आहोत. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं. रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे. म्हणूनच आम्ही तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.
सोमय्या यांनी ३१ डिसेंबरलाच व्हिडिओ केला होता ट्विट !
किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरलाच एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत आपण नव्या वर्षात कुणाकुणाचा हिशोब चुकता करणार आहोत हे सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच दुसऱ्य दिवशी ते रेवदंडा या ठिकाणी पोहचले आहेत. नव्या वर्षात घोटाळे बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्यांनी जाहीर केलं होतं. एक व्हिडिओ ट्विट करत किरीट सोमय्या म्हणाले की उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात अनिल परब, हसन मुश्रीफ, अस्लम खान, किशोरी पेडणेकर यांच्या सदनिका आणि ठाकरे परिवाराचे १९ बंगले हे सगळे घोटाळे बाहेर काढणार. त्यानंतर ते आज तातडीने रेवदंडा या ठिकाणी पोहचले आहेत.