मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना वाढल्यास राज्यातील महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करू असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्ट्टेवार यांनी म्हटले आहे.
राज्यात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहीले आहे. मुंबई, पुणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये कोरोना रूगांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज ११३४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे महापालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर संकट निर्माण झाले आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकींवर सावट आले आहे. यावर बोलताना विजय वड्ट्टेवार यांनी पुढचे आठ दहा दिवस महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. या दहा दिवसात किती पट रूग्ण संख्या किती वाढतेय त्यावरच निर्णय घेता येईल. येणाऱ्या निवडणूकीला बराच कालावधी आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम स्पष्ट होतोय. दोन महिने आहेत, त्या परिस्थितीवर चर्चा होईल. तशी परिस्थिती उद्भवली तर आम्हाला विनंती करावी लागेल. निवडणुका टाळता येतील का? हा देखील प्रश्न असल्याचे वड्ट्टेवार यावेळी म्हणाले.