TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजप लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंदी करावी : देवेंद्र मराठे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रात त्याच पद्धतीने प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना या आजाराने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेले आहे. कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये दररोज अकराशे ते बाराशे रुग्णांची भर पडत असताना तसेच सामान्य रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमधील जागा अपुरी पडत असताना जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधी मात्र, चमकोगिरी करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे भाजप लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.

देवेंद्र मराठे म् यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्याला दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. दोन लोकसभा मतदारसंघातील जनतेने भाजपच्या लोकप्रतिनिधींना खासदार म्हणून निवडून दिले आहे. जळगाव जिल्ह्याचे दोन्ही खासदार कोरोना सारख्या या महामारीमध्ये कुठेही कधीही फिरतांना दिसलेले नाहीत. कोरोनाच्या या महामारीमध्ये कुठल्या खासदाराने जळगाव जिल्ह्याला मोठे जम्बो कॉवीड सेंटर उभारून दिले ..?, त्याच पद्धतीने कुठल्या खासदारांनी जळगाव जिल्ह्याला केंद्राकडून जास्तीत जास्त व्हेंटिलेटर मागून दिले..?, त्याच पद्धतीने खासदारांना वार्षिक पाच कोटी रुपयांचा इतका निधी असतो, परंतु आपल्या जिल्ह्याचे दुर्भाग्य इतकी दोघी खासदारांनी पाच कोटी रुपये निधी हा कुठे खर्च केलाय याचा सविस्तर तपशील जनतेसमोर ठेवावा..?, असे सवाल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांचा विचार केला तर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा आहे. खासदार उन्मेश पाटील जिल्हाधिकारी कार्यालय सोडले तर लोकसभा मतदारसंघात कुठेही दिसत नाही. खासदार उमेश पाटील यांनी काम करत असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यापेक्षा जर स्वतः कोवीड सेंटरला जाऊन तेथील रुग्णांची विचारपूस करून तेथील सुविधा कशा वाढवता येतील. या पद्धतीचे नियोजन करून केंद्राकडून जास्तीत जास्त निधी अथवा व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्याला कसा करता येईल या पद्धतीचे नियोजन केले पाहिजे. सतरा लाख मतदारांनी एका मोठ्या अपेक्षेने खासदार निवडून दिलेला असतो, परंतु सध्याची परिस्थिती बघता खासदार दिसेनासे झाले आहे..! तसेच रावेर लोकसभा मतदार संघाचा विचार केला असता खासदार श्रीमती रक्षा खडसे ह्या दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु केवळ भुसावळ येथील रेल्वेचे डी आर एम ऑफिस व जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय सोडता ताई मात्र कुठेही फिरताना दिसत नाहीत. अशीही चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

ताई एक महिला भगिनी आहेत महिलांचा आम्हाला देखील आदर आहे. परंतु आमच्या पेक्षा जास्त अपेक्षा या रावेर लोकसभा मतदार संघातील आपणास निवडून दिलेल्या जनतेच्या आहेत. तसेच ताई राज्य सरकार वरती टीका करता परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याच ताई एखाद्यावेळेस भाजप पक्षावरती टीका करताना दिसल्यास आश्चर्य मानून घेऊ नये, अशीही चर्चा सध्या ताईंच्या प्रतिक्रियेनंतर सुरू आहे. परंतु असो राज्य सरकार वरती टीका करणे अतिशय सोपं असतं परंतु खासदार म्हणून आपण रावेर लोकसभेच्या जनतेसाठी किती जम्बो कोबिर सेंटर उभारले..? याचे उत्तर आपण द्यावे, तेथील जनतेच्या सुरु असलेल्या लाॅकडाऊनमधील रोजगारासाठी आपण खासदार म्हणून किती विशेष निधी मतदार संघासाठी व जिल्हा करता आणला..? याचा देशील तपशील आपण द्यावा. असेही मागणी त्यांनी केली आहे.

अधिकारी, आरोग्य यंत्रणा, राज्य सरकार हे टीका करण्याकरता अतिशय सोपं व्यासपीठ सध्या भाजप लोकप्रतिनिधींसाठी बनलेलं आहे. परंतु टीका करताना सर्वात पुढे होते ते म्हणजे आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोळे मामान विषयी काय बोलावं गेल्या दोन पंचवार्षिक पासून मामांनी खरंच जनतेला मामा बनवलं आहे का ..? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडलेला आहे.

शहरांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती असताना कोरोनाच्या या महामारीमध्ये खाजगी रुग्णालय फुल आहेत. कुठेही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही अशा परिस्थितीमध्ये शहराच्या आमदारांनी रस्त्यावरती उतरून शहरातील जनतेसाठी योग्य अशी सुविधा निर्माण करून दिली पाहिजे. परंतु आमदार साहेब सध्या राज्य सरकार व मुख्यमंत्री महोदय यांच्या वरती टीका करण्यात व्यस्त आहे. परंतु आपले कर्तव्य सोडून इतरांवर टीकाटिपणी करण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. हे आमदार साहेबांना कधी कळेल. सुमारे चार लाख मतदारांनी आपल्या वरती विश्वास टाकून आपल्याला आमदार म्हणून निवडून दिले आहे. याची तरी जाण आमदार साहेबांनी ठेवावी.

शहरातील जनतेसाठी आमदार राजूमामा भोळे यांनी कुठलं कोवीड सेंटर उभारलं किती व्हेंटिलेटरची सुविधा आमदारांनी करून दिली..? याचे देखील उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. केवळ चमकोगिरी टीकाटिपणी करण्याची ही वेळ नाही आहे. राजकारण करण्यासाठी अख्खे आयुष्य पडलेला आहे. परंतु लोकांची आयुष्य उध्वस्त होत आहेत त्याची मात्र या भाजप लोकप्रतिनिधींना काहीएक पडलेली नाही. त्यामुळे किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी राजकारण बंद करून काम करत असलेल्या जिल्हा प्रशासनाला मदत होत असल्यास मदत करावी, किंवा घरामध्ये स्वतःला क्वारंटाईन करून ठेवावे.

राज्य सरकार केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसल्यावर ही राज्यातील जनतेला कुठल्याही प्रकारे वाऱ्यावर सोडत नाही आहे व अतिशय स्वतःच्या कुटुंब या मधील सदस्य समजून मुख्यमंत्री महोदय देखील वेळोवेळी योग्य असं मार्गदर्शन करून महाराष्ट्रातील जनतेला धीर देत आहे व महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा अतिशय चांगल्या प्रकारे ही परिस्थिती हाताळत नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याला कोरोना पासून मुक्त करतील. असे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

राज्यांनी लॉकडाऊनला अंतिम पर्याय म्हणूनच पाहावं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो,मुंबई चे २४ खेळाडू करणार महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व

January 31, 2025

दुर्दैवी ! ट्रक आणि टाटा छोटाहत्तीच्या भीषण अपघातात सासू-जावयासह अन्य एक ठार

April 27, 2022

खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा तालुक्यात समाजपयोगी कार्यक्रम उत्साहात !

November 25, 2022

कपाशीवरील गुलाबी बोड अळीचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी व्यवस्थापन

November 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group