अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. 500 जण नदीत पडले आहे. गुजरातच्या मोरबी यथे ही मोठी दुर्घटना घडली आहे. मोरबीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला आहे. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत जवळपास 500 जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते. यावेळी पूलावर असणारे चारशे पेक्षा जास्त लोक नदीत बुड्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती केली होती. गुजरातचे मंत्र्यांनी बचाव कार्य सुरु असल्याची माहिती एबीपी न्यूजला दिली आहे.
पीएम मोदींनीही या घटनेबाबत अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे. रुग्णवाहिका तातडीने रवाना करण्यात आल्या. आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल बंद होता. याच महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी तो वाहतूकीसाठी खूला करण्यात आला होता. दरम्यान, मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिला प्रशासनाच्या वतीने हेल्पलाइन नंबर (02822243300) जाहीर करण्यात आलेला आहे. पुलाची क्षमता सुमारे 100 लोकांची आहे, मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या पूलावर सुमारे 500 लोकांची गर्दी जमली होती. हेच अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.