जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मिळून महापालिका प्रशासनाला आपली किडनी विकून मिळालेल्या रक्कमेतून शहरातील रस्ते तयार करण्याचे साकडे घातले आहे.
दीपककुमार गुप्ता यांनी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन दिले. शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली असून, यामुळे जळगावकरांना पाठीचे, मानेचे, मणक्यांचे विकार होत आहेत. त्यात अनेक लहान-मोठे अपघात होऊन हाता-पायाला देखील दुखापत होत आहे. इतर विकार होण्यापेक्षा आता आमच्या किडनी घेऊन, ती विक्री करून मिळालेल्या रक्कमेतून खड्डे दुरुस्त केले तर अनेकांना भविष्यात होणाऱ्या त्रासापासून दूर ठेवता येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिवराम पाटील, वीजय बांदल, अमोल कोल्हे, मतिन पटेल, संजय पाटील, अनिल नाटेकर, किरण ठाकूर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.