जळगाव(प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली गावात मध्यरात्री बंद घरातून दोन मोबाईल आणि चांदीच्या मुर्त्या असा एकूण १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तालुकयातील चिंचोली येथे युवराज भिमराव पवार (वय-४०) हे मंगळवार २ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे आपल्या परिवारासह झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या मुर्त्या असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता लक्षात आली. याबाबत युवराज पवार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफ्फार तडवी हे करीत आहे.