धानोरा ता.चोपडा (प्रतिनिधी) येथुन जवळच असेलेल्या अडावद ता. चोपडा येथे अडावद शहर युवा मंच तर्फे पाडव्यानिमित्त बळीराजा गौरव दिवस साजरा करण्यात आला. बळीराजांची प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तीचे पुजन जितेंद्रकुमार शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले.
बळीराजांच्या गौरव दिनानिमित्त शेतकरी वर्गाला बळ देण्याचं कार्य शासकीय योजनेमार्फत केले जाईल असे प्रतिपादन पी.आर. माळी यांनी याप्रसंगी केले. तर बळीराजा म्हणजे स्वतःच्या खांद्यावर नांगर घेऊन शेती करून मातीचे रूपांतर सोन्यात करण्याचं कार्य बळीराजाने केलंय अशी उपमा लक्ष्मण पाटील यांनी ही दिली. तसेच ते बोलत असताना बळीराजा गौरव दिनानिमित्त आजचा दिवस म्हणजेच शेतकऱ्यांचा गौरवाचा दिवस आहे. ‘इडा पीडा टळो आणि बळीच राज्य येवो’ अश्या शब्दात बळीराजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम त्यांनी बोलतांना केलं.
तसेच राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त गावातील पत्रकारांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान ही करण्यात आला. यात पत्रकार पी. आर. माळी, पत्रकार जितेंद्रकुमार शिंपी, फारुकशाह नौमानी, गिरीष जाधव यांचा ही सन्मान अडावद शहर युवा मंचच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रम अंती बळीराजांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयात भेट म्हणून देण्यात आली.
कार्यक्रमाचे सरपंच पती पी.आर. माळी तर प्रमुख पत्रकार जितेंद्रकुमार शिंपी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य विजय साळुंके, हनुमंत महाजन, वासुदेव महाजन, जितेंद्र परदेशी, सचिन महाजन, फारुक शाह नौमानी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अतुल महाजन, भुषण पाटील, कैलास बारी, मनीष चौधरी, भूपेंद्र सोनवणे यांनी परिश्रम घेतले.