भुसावळ (प्रतिनिधी) आपलं मन दुःखात आहे,ही पायरी लवकरात लवकर ओळखणे मानसिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे लक्षण आहे. असे प्रतिपादन आज मानसोपचार तज्ञ निलेश गोरे यांनी केले.
आज जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने वासुदेव जेष्ठ नागरिक संघ आयोजित “जेष्ठ नागरिक आणि मानसिक आरोग्य” याविषयावर निलेश गोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष धनराज पाटील, विश्वनाथ वाणी, प्रकाश पाटील,विशाल जंगले,डॉ. नितु पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सर्व जेष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देत अभिवादन करण्यात आले.सर्व जेष्ठ नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत जेष्ठ नागरिक दिन साजरा केला.
पुढे ते म्हणाले की कोणाकडून अपेक्षा असणे,म्हणजेच दुःख निवडणे होय. माणूस आपले शरीर सोडून सर्वांवर प्रेम करतो पण स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. चांगल्या शरीरात चांगले मन वास्तवास राहते,त्यामुळे शाररिक बुद्धिमत्ता वाढवा. चांगले विचार नक्कीच मानसिक आरोग्य प्रसन्न ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे जसे अनावश्यक बाबी आपण मोबाईल मधून डिलीट करतो त्याचप्रमाणे मनातील वाईट बाबी ह्या सतत डिलीट करायला हवे, असे विविध बाबींवर निलेश गोरे यांनी आज जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी इंदूबाई सपकाळे,लता जंगले,सुलोचना पाटील,वैशाली पाटील,अनिल पाटील,लोटन फिरके,राजाराम चौधरी, मोतीराम चौधरी,भानुदास पाटील,सोपान नेमाडे,डॉ. अशोक ढाके, मधुकर पाटील,पुंजो भारंबे,बी. आर. पाटील,खुशाल महाजन,सुरेश नेहेते,पंडित पाटील,संजीव चौधरी,, पुंजो भारंबे,जंगले सर आदी जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविक धनराज पाटील,सूत्रसंचालन प्रकाश पाटील,आभार प्रदर्शन विश्वनाथ वाणी यांनी केले. कार्यक्रमांनातर अल्पोपहाराचा कार्यक्रम पार पडला.
आयुष्याच्या उत्तरार्धात फक्त गोडवा असावा,कुठलेही कटू आठवण राहू नये. म्हणून आज वासुदेव जेष्ठ नागरिक संघात सर्व सभासदांनी एकमेकांना पेढे भरवत जेष्ठ नागरिक दिन साजरा केला.
– डॉ. नितु पाटील,संस्थापक वासुदेव जेष्ठ नागरिक संघ !