धरणगाव प्रतिनिधी : तालुक्यातील धारशेरी गावात स्वस्त धान्य दुकानाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. रेशनपासून वंचित लाभार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात धडक देत आपला संताप व्यक्त केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी देखील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
धार-शेरीतील नागरिकांचा आरोप आहे की, नियम धाब्यावर बसवून गावातील स्वस्त धान्य दुकान 15 किलोमीटर दूर राहणाऱ्या दुकानदाराला जोडण्यात आले. गावातील नागरिकांनी प्रतापराव पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केली. यानंतर त्यांनी संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारत खडे बोल सुनावले. यावेळी प्रतापराव पाटील यांनी तहसीलदारांनाही फोनवरून त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन करतील.
लाभार्थ्यांचे गंभीर आरोप
पाच महिन्यांचे रेशन वाटपच झाले नाही, वारंवार तक्रारी करूनही पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष नियमबाह्य पद्धतीने दुकान जोडले, धार-शेरीतील नागरिकांनी पुरवठा विभागावर डोळेझाक केल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.















