नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसागणिक घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ३२ हजार ९०६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर २०२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३१ हजार ४४३ नव्या बाधितांची नोंद झाली. गेल्या ११८ दिवसातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ३१ हजार ३१५ वर पोहोचली आहे. गेल्या १०९ दिवसांतली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर देशात काल दिवसभरात एकूण ४९ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३ कोटी ६३ लाख ७२० वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बर होण्याचा दर आता ९७.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. देशात काल दिवसभरात २०२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या आता ४ लाख १० हजार ७८४ वर पोहोचली आहे. तर देशाचा मृत्यूदर १.३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज ९ हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. काल ७,६०३ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १५ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ लाख २७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के आहे. राज्यात काल 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
देशातलं लसीकरण
देशात काल दिवसभरात ४० लाख ६५ हजार ८६२ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी २५ लाख ५८ हजार ८४५ नागरिकांनी पहिला डोस घेतला तर १५ लाख ७ हजार १७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता ३८ कोटी १४ लाख ६७ हजार ६४६ झाली आहे.