चोपडा (प्रतिनिधी) येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या वहनोत्सव व रथोत्सवाची सांगता आज परंपरे प्रमाणे रथावर बालाजींची मूर्ती आरुढ करुन रथाच्या घराजवळच दहा फूट रथ ओढून पार पाडण्यात आली.
दरम्यान नवरात्रीच्या काळात व्यंकटेश बालाजीचा वहनोत्सवाची परंपरा मंदिरातच वहनारुढ बालाजी करुन रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान भक्तांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आले होते. कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेवून संस्थानचे विश्वस्त प्रशासन यांनी वहनोत्सव व रथोत्सवाची परंपरा पाळण्यासाठी कमीत कमी गर्दी व्हावी असे नियोजन यंदा करण्यात आले. दरवर्षी ब्रम्होत्सवात श्री.बालाजी विविध वहनांवर आरूढ होवून शहरातील विविध भागात वाजत गाजत जावून भक्त दर्शनाचा लाभ घेत होते. तसेच आश्विन शुध्द एकादशीला रथ निघून दोन दिवस रथयात्रा शहरात निघत होती. या यात्रेला सुमारे साडे पाचशे वर्षांची परंपरा आहे.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता संस्थानचे विश्वस्त आणि मानकरी विक्रमसिंग देशमुख व जितेंद्र वाघ, आनंदराव देशमुख यांच्या हस्ते चक्र पूजा करण्यात आली. पौरोहित्य सुनिल नाईक यांनी केले. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी, पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, तहसीलदार वाघ, निवृत्त मॅनेजर किरण गुजराथी, रथोत्सव समितीचे संजय सोमाणी, मनिष पारिख, नितीन शहा, मनोज चौधरी, दिपक पाटील, किरण चौधरी, लालाभाई गुजराथी, विनोद हुंडीवाले, अचल अग्रवाल, पार्थ गुजराथी यांच्यासह वहनोत्सवात व रथोत्सवात कार्यरत असणारे सर्व मानकरी व भाविक उपस्थित होते.