नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानी मंत्र्याने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर, भाजपने शुक्रवारी काँग्रेसवर टीकेचा भडिमार करत, काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.
भारतातील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हे पाकिस्तानचे कारस्थान होते, हे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुली खुद्द पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत मंत्री पवार चौधरी यांनी या हल्ल्याचे समर्थन करताना इम्रान खान सरकारचे हे मोठे यश असल्याचा दावा केला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथे सुरक्षा दलाच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 40 जवानांना वीरमरण आले. काँग्रेस व इतर पक्षांनी हा हल्ला म्हणजे राजकीय कट- कारस्थान असल्याचा आरोप केला होता. तसेच आता पाकिस्तानी मंत्र्यानेच हल्ल्याची कबुली दिली असल्याने काँग्रेसने भाजपावर केलेला आरोप खोटा ठरला आहे. त्यामुळे काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे असं ट्विट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री पवार चौधरी यांनी पुलवामा हल्ला हे पंतप्रधान इम्रान खान सरकारचे मोठे यश होते, असे वक्तव्य करत इमरान यांच्या अडचणीत भर घातली आहे. पाकिस्तानचे मंत्री उघड दहशतवादाचे समर्थन करत असल्याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची टिपणी भारताने केली आहे. यामुळे पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर काँग्रेसने देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे.