मुंबई (वृत्तसंस्था) राज्य शासनाने जनजीवन सुरळीत होण्याच्या दृष्टीने लॉकडाउनचे काही नियमही शिथिल केले, पण याचा अर्थ कोरोनाचा धोका संपलेला नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण माझी तब्येत ठीक आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्या”, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.” असं अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, देशातील १० वर्षे अथवा त्याहून अधिक वयोगटातील २१ टक्क्यांहून अधिक जणांना यापूर्वीच कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे आयसीएमआरने अलीकडेच केलेल्या सीरो सर्वेक्षणात म्हटले आहे, असे गुरुवारी सरकारने जाहीर केले. त्याचप्रमाणे करोनाची सहज लागण होण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.