अमरावती (प्रतिनिधी) येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आज सिंचन विभागाची दैनंदिन आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीत जिल्ह्यातील सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आ. विरेंद्र जगताप, आ. सुलभा खोडके, आ. बलवंत वानखडे, मा. संजय खोडके आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रकल्पातील विविध समस्यांची माहिती घेतली. लवकरच या सर्व अडचणींवर मात करत इथल्या प्रकल्पांना गती दिली जाईल.