मुंबई (वृत्तसंस्था) मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच पर्यावरणवाद्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचेही जाहीर केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, आरेतील प्रस्तावित कारशेड आता कांजूरमार्गला होणार. आरेत कारशेड होणार आहे की नाही याबाबत देखील महत्वाची घोषणा त्यांनी केली. आरेत कारशेड होणार कांजूरमार्गची सरकारी जमीन शून्य रुपये किमतीत देणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. जनतेचा एकही पैसा खर्च होणार नाही. या जागेसाठी एकही रुपया खर्च केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. जंगलात शहरे होत आहेत परंतु जगाच्या पाठीवर शहरात जंगल कुठे होत नाही. ते आपण करत आहोत. 800 एकरवर शहरामध्ये आपण जंगल वसवणार आहोत. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहाय्य आहे. पर्यावरण मंत्री नात्याने आदित्य ठाकरे, महसुल मंत्री थोरात, मंत्री सुनील केदार, मेट्रो संबंधित अधिकारी या सर्वांनी आपुलकीने, प्रेमाने काम केले. ही जीवसृष्टी, वृक्ष वल्ली सोयरे केवळ म्हणण्याऐवजी कृतीत आणून विकासाचे स्वप्न खरे करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.