धरणगाव (प्रतिनिधी) एस. पी.कुलकर्णी लिखित व कृपा प्रकाशनाच्या ‘तरंग या वात्रटिका ‘संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे यांच्या व काव्य रसिकांच्या हस्ते येथील विक्रम वाचनालयात नुकतेच संपन्न झाले.
या प्रसंगी ज्येष्ठ कवी रमेश लाहोटी, प्रकाश किनगावकर, वा.ना.आंधळे,विलास पाटील,, बी. एन. चौधरी व एस. कुलकर्णी यांनी आपल्या बहारदार कवितानी रंगत आणली. तरंगमध्ये सामाजिक राजकीय स्थितीवर परखड भाष्य विनोदी शैलीत असल्याचे मत व्यक्त केले. अभ्यासू व विस्तृत सूत्र संचालन बी. एन. चौधरीनी केले.
कृपा प्रकाशनाचे विभाकर कुररंमभट्टी यांनी व संयोजक एस.पी. कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. काव्य रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. खान्देशचे आद्य वात्रतटिका कार कै. मधु साळी, महाकवी गोविंदानुज यांच्या विनोदी कविता वाचनाने पुण्यस्मरण करण्यात आले.