जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम ऐक्य राज ठाकरे यांना सहन होत नाही का ?, असा प्रश्न अल्पसंख्यांक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव रागीब शेख यांनी उपस्थित केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात मस्जिद व दर्गा विरोधात केलेले वक्तव्य हे निषेधार्थ आहे. देशात महागाईचा भस्मासुर अर्थव्यवस्था व सामान्य नागरिकांना बर्बाद करीत असताना त्यावर भाष्य करण्याऐवजी मुस्लिम विरोधी वातावरण निर्माण करून महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करीत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोक आनंदाने नांदत आहे. राज ठाकरे मनसे अध्यक्ष आपला बंद पडलेला इंजिन समाजात तेढ निर्माण करून चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण ते यावेळी शक्य होणार नाही. असंही रागिब अहमद यांनी म्हटले आहे.