भुसावळ (प्रतिनिधी) येथील रहिवासी,वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नि.तु.पाटील यांनी 108 दिवसात माँ नर्मदा परिक्रमा नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सवाद्य मिरवणूक काढून परिक्रमावासी डॉ. नितु पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सहा एप्रिल हनुमान जन्मोत्सव या दिवशी डॉ. नितु पाटील यांनी संकल्प करीत ओंकारेश्वर येथून माँ नर्मदा परिक्रमा उचलली आणि मग तिथून चालत चालत ते विमलेश्वर ,गुजरातला गेले. त्या ठिकाणी समुद्र पार करून मिठी तलाई ते नेमावर , मग पुढे माँ नर्मदा उगमस्थान अमरकंटक आणि मग तिथून परत ओंकारेश्वर असा संपूर्ण तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास चालत चालत 108 दिवसांत पूर्ण केला.
या प्रवासामध्ये वेगवेगळे अनुभव आणि अनुभूती आले. या परिक्रमा मध्ये त्यांनी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगढ अशा चार राज्यांचा प्रवास केला. विविध आश्रमांना, संतांना भेटी देत त्यांच्या आशीर्वाद घेतले. त्याबद्दल सगळे विविध अनुभव त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक वर दिवस नुसार सर्वांसाठी लिहून ठेवले आहेत.
डॉ. नितु पाटील हे भुसावळ विभागातील चालत माँ नर्मदा परिक्रमा करणारे प्रथम तरुण डॉक्टर असून त्यांचे मूळगाव तळवेल येथील पायी परिक्रमा करणारे हे पहिले व्यक्ती आहेत. 22 जुलैला त्यांना 108 दिवस पूर्ण झाले. 23 जुलैला त्यांनी अधिकृत पूजा करून औकारेश्वर आणि ममलेश्वरी या ठिकाणी जल चढून परिक्रमा पूर्ण केली.
यावेळी वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे धनराज पाटील,प्रभाकर झांबरे, प्रकाश पाटील,निलेश मालविया,तसेच राजकीय पदाधिकारी प्रशांत पाटील,अतुल झांबरे,राजेंद्र चौधरी,परीक्षित ब्राहाटे, रामाशंकर दुबे, चंद्रशेखर झोपे, प्रदीप भंगाळे,पिंटू कोठारी,गिरीश महाजन, निक्की बत्रा,सतीश सपकाळे,प्रवीण चौधरी,मुकेश पाटील,विशाल जंगले,अशोक डाके आदी मंडळी, मित्र परिवार,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगाच्या कल्याणासाठी परिक्रमा समर्पित…!
प्रापंचिक जीवन जगत असताना अध्यात्मिक अनुभूती घेणे ही एक फार मोठी साधना आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील माँ नर्मदा परिक्रमा ही एक खडतर तपश्चर्या आहे. माँ नर्मदा मातेच्या कृपेने 108 दिवसात परिक्रमा पूर्ण झाली असून ही परिक्रमा मी जगाच्या कल्याणासाठी माँ नर्मदा मातेच्या चरणी समर्पित करीत आहे.