नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मला वाटते, की महाराष्ट्र सरकारवरील संकट लवकरच दूर होईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. यावेळी, हे संकट आपण दूर कराल का? असा प्रश्न विचारला आला असता, गडकरी यांनी “आगे-आगे देखो होता है क्या?, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी गडकरी पुढे म्हणाले की, मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले, तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल. सीएम ठाकरेंवर घोंगावणारे ढग दूर होतील का? आपले आणि त्यांचे संबंध अगदी जवळचे आहेत, असे मानले जाते? असा प्रश्न केला असता, गडकरी म्हणाले,व्ययक्तीक संबंध, हे राजकीय संबंधांपेक्षा वेगळे असतात. मग ते सरकारमध्ये असोत अथवा नसोत. संबंध तसेच असतात. ते एका वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र सरकारवर आलेल्या संकटामागे भाजप आहे? यावर गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी एवढे नक्की सांगेन, की जर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले, तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल.