TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

vijay waghmare by vijay waghmare
March 1, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी – आमदार एकनाथराव खडसे यांनी भुसावळ शहराच्या रखडलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न विधान परिषदेत अत्यंत आक्रमकपणे मांडला. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम दीर्घकाळ अपूर्ण राहिल्याने शहरात उद्भवलेल्या पाणीटंचाईवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न झाल्याने प्रकल्पाचा खर्च तब्बल १५ कोटी रुपयांनी वाढला असून, याला जबाबदार कोण? असा रोखठोक सवाल खडसे यांनी सभागृहात उपस्थित केला.

विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करताना एकनाथराव खडसे यांनी भुसावळ शहराची विदारक स्थिती मांडली. ते म्हणाले की “अमृत पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ११ जलकुंभ आणि जलवाहिनीचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु आजही हे काम अर्धवट आहे. या दिरंगाईमुळे प्रकल्पाचा खर्च १५ कोटींनी वाढला असून, हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे.”
शहरात जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांमुळे १०० पेक्षा जास्त ठिकाणी मोठी गळती होत आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून, भुसावळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना चक्क १० ते १२ दिवसाआड पाणी मिळत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

READ ALSO

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

भुसावळ हे रेल्वे जंक्शन असून येथे ऑर्डनन्स फॅक्टरी आणि दीपनगर औष्णिक वीज केंद्रासारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत. अशा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट होणे दुर्दैवी असल्याचे खडसे यांनी नमूद केले.
सदर प्रश्नाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी उत्तर देताना सांगितले केंद्र पुरस्कृत अमृत १ अभियानंतर्गत भुसावळ शहराच्या रुपये ९०.८४ कोटी पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी दिनांक २२ मे, २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आली होती.

योजनेच्या या टप्प्यात समाविष्ट कामामधील एकूण ११ जलकुंभापैकी ८ जलकुंभाचे RCC व पाईप असेब्लीचे काम पूर्ण झाले आहे, तसेच, १९८.३८५ कि.मी. वितरण व्यवस्थेपैकी १९३.०२७ कि.मी. वितरण व्यवस्था टाकण्यात आलेली आहे.

तथापि, योजनेतील सर्व उपांगांची कामे पूर्ण न झाल्याने व योजना दीर्घकाळ अपूर्ण राहिल्याने शासन स्तरावरून आढावा घेऊन योजना पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्तता व विलंबाबाबत जबाबदारी निश्चिती / कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने नगरपरिषदेमार्फत संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात आले आहे व प्रकल्पाचे काम आहे त्या स्थितीत बंद करण्यात आले आहे.
भुसावळ शहराची सध्याची वितरण व्यवस्था पीव्हीसी प्रकारच्या पाईप्सची आहे व ती काही प्रमाणात जीर्ण झाल्यामुळे शहरात जलवाहिनीची गळती होत असते. तथापि, नगरपरिषदमार्फत प्राथम्याने दुरुस्तीचे कामे करून पाण्याचा अपव्यय कमीत कमी राखण्यात येतो. तसेच, तांत्रिकदृष्ट्‌या यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यास अथवा विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होतो ही वस्तुस्थिती आहे. तथापि, नागरिकांची पाण्याची गरज भागविण्याकरीता नगरपरिषद मालकीच्या विहिरीमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, नागरिकांच्या खाजगी विंधन विहिरी सुद्धा उपलब्ध आहेत.

भुसावळ ही रेल्वे जंक्शन असून रेल्वेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. तसेच, ऑर्डनन्स फॅक्टरी (वरणगांव व भुसावळ), दीपनगर औष्णिक वीज केंद्र या संस्था भुसावळ नगरपरिषदेच्या हद्दीत नसल्यामुळे त्यांना नगरपरिषदमार्फत पाणीपुरवठा करण्यात येत नाही.

भुसावळ नगरपरिषद क्षेत्रातील विद्यमान जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता तत्कालीन लोकसंख्या विचारात घेऊन अस्तित्वात असून सदरची यंत्रणा आजच्या लोकसंख्येच्या तुलनेने कमी असल्यामुळे शहरास नियमित पाणीपुरवठा करण्यास अडचणी आहेत ही वस्तुस्थिती आहे.

अमृत अभियानांतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम आहे त्या स्थितीत बंद करण्यात आलेले असून राहिलेल्या कामांचे सुधारित खर्च अंदाजाबाबत नगरपरिषद मार्फत कार्यवाही सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले
यावर केवळ कंत्राटदारावर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका खडसे यांनी घेतली. यावेळी योजना पूर्णत्वास नेण्याची मागणी करताना खडसे म्हणाले

रखडलेल्या ३० टक्के कामासाठी आणि नवीन जलकुंभांसाठी तातडीने फेरनिविदा काढून काम युद्धपातळीवर पूर्ण करावे
शहरातील जुन्या पीव्हीसी पाईप्सच्या वाहिन्या बदलून गळती थांबवावी, जेणेकरून पाण्याची नासाडी थांबेल.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सध्याचे जलशुद्धीकरण केंद्र अपुरे पडत असून त्याची क्षमता वाढवण्याची कार्यवाही शासनाने करावी. अशा विविध मागण्या एकनाथराव खडसेंनी केल्या.

एकनाथराव खडसे यांनी हा प्रश्न लावून धरल्यामुळे भुसावळच्या पाणी योजनेला आता पुन्हा गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने या कामावर लक्ष देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असले तरी, खडसे यांनी या कामाचा पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Next Post

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी, भाजपला फरक पडत नाही : चंद्रशेखर बावनकुळे

July 23, 2021

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओही केला व्हायरल ; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 15, 2023

पालकमंत्र्यांनी वारकऱ्यांचा वारसा जपत भजनी मंडळांना केले साहित्याचे वाटप !

November 25, 2023

पाचोऱ्यात दुचाकीचा कट लागल्याच्या वादातून तरुणाचा खून ; ५ संशयित ताब्यात !

January 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group