पाचोरा (प्रतिनिधी) जळगावातील सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कुणाची याची प्रचीती येते, पाकिस्तानला जरी शिवसेना कुणाची विचारली तरी तो सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिदू झालेल्या निवडणूक आयोगाला समजत नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. पाचोरा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांची आज पाचोऱ्यात सभा होत आहे. त्यासाठी ते येथे पोहचले आहेत. त्यानंतर त्यांनी स्थानिक कार्यक्रमांना हजेरी लावली ठाकरे यांच्या हस्ते दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण सायंकाळी झाले. यानंतरच्या जाहीर सभेत बोलतांना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पाकिस्तानलाही विचारले की, शिवसेना कुणाची हे पाकिस्तानही सांगेल पण आमच्या निवडणूक आयोगालाही कळत नाही. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल पण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. आपल्या सभा हाऊसफुल्ल होत आहेत. काहींना वाटले होते की, ते म्हणजे शिवसेना अरे हट्ट.. आम्ही सभेत घुसणार अशा घुशी खूप पाहील्या. अशा घुशींना बिळातून बाहेर काढून आपटणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
जगणार कुणासाठी स्वतःसाठी कि, जनांसाठी. शेवटच्या क्षणांपर्यंत आर. ओ. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य केले. शेतकरी हे आर. ओ. पाटलांचे कुटुंब होते. पिकेल ते विकेल यावर जगभर संशोधन व्हावे. 40 गद्दार गेले तर काही वाटत नाही. पण आर ओ तात्या यांच्या निधनाने खूप वाईट वाटलं. आर ओ तात्या यांनी वैशाली ताई यांची जी ओळख त्यावेळी सांगितली तेव्हा कळलं नव्हतं. पण आज वैशाली ताई यांनी ती ओळख दाखवून दिली.
आज भाजपकडून गाईला जेवढी सुरक्षा दिली जाते, तेवढी सुरक्षा इथल्या आईला द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, ठाण्यातील रोषणी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. ती हात जोडून कळवळत असतानाही तिच्या पोटात मारलं जातंय. पण तिची तक्रार नोंदवून न घेता, उलट तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला,असेही ठाकरे म्हणाले.