इंदूर (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदौर शहरातील स्वर्णबाग कॉलनीत शनिवारी पहाटे ५ च्या दरम्यान एका दुमजली इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत सात जणांचा मत्यू (Death) झाला. दरम्यान, एकतर्फी प्रेमातून या सात जणांची हत्या करण्यात आली आहे. संजय उर्फ शुभम तरुणीच्या अनाठायी प्रेमाने आंधळा झाला होता. वेड्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्याने आतापर्यंत ७ जण जळून खाक झाले आहेत. तर ५ जण जखमी झाले आहेत.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये काल रात्री भीषण आग लागली होती. येथील विजय नगर भागातील स्वर्णबाग कॉलनीतील इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ पुरुष आणि १ महिलेचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुमजली इमारतीला दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग लवकरच आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर जखमींवर एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इमारतीतील सर्व रहिवासी भाडेकरू होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
एफएसएल आणि एमपीईबीचे पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले होते. इंदूरचे जिल्हाधिकारी मनीष सिंह म्हणाले की, स्वर्णबाग कॉलनी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पोलीस प्रशासन घरमालकावर गुन्हा दाखल करणार आहे. आगीचे कारण तसेच कोणता कट आहे, याचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर दुपारी २ वाजता ईश्वर आणि त्याची पत्नी नीलू यांचे मृतदेह कॉलनीत आणण्यात आले, तेथून नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. दुमजली इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही इमारत सील करण्यात आली आहे. सकाळीच फॉरेन्सिक विभागाची टीम तपासासाठी घटनास्थळी पोहोचली होती. आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.