नांदुरा (प्रफुल्ल बिचारे) आज फुली तालुका नांदुरा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये(सबस्टेशन) त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कंडारी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला.
भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. परंतु या कृषिप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांनाच होतोय नाहक त्रास ! वीज वितरण कंपनीच्या अनियमित वेळापत्रकामुळे शेतकरी होतोय हवालदिल ! महाविज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने शेतकरी त्रस्त झाले आहे. आज फुली तालुका नांदुरा येथील महाविज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये(सबस्टेशन) त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कंडारी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला. याचं कारण एकच अनियमित वीज मिळण्याचे, वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे जी आठ तास मिळणारी लाईट आहे, त्यामध्ये सुद्धा वारंवार लाईट जात-येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम करायचा तरी कसा? याचा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहे.
यावर्षी हजारो हेक्टर वरती रब्बी पिकाची लागवड झालेली आहे. आणि या पिकाला पाणी देण्यासाठी विजेची सक्त गरज असून शेतकरी रात्री अपरात्री शेतामध्ये जाऊन पाणी देत असतो. परंतु वीज वितरणच्या अनियमित कारभाराने लाईट ही पाच ते दहा मिनिटांतून जात-येत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोटारी जळणे, स्टार्टर, ऑटो स्विच, यासारखी साधने शेतकऱ्याची जळत आहेत. पर्यायाने शेतकऱ्यांनी पेरलेल्या रब्बी पिकाचे पाणी न मिळाल्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. तरी महावीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. एकीकडे प्रशासन म्हणतोय की. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. परंतु शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान आणि असाहाय्य त्रास याला जबाबदार आहे तरी कोण? शेतकऱ्यांचा वापर फक्त हा निवडणुकीपुरताच होतोय का? असे प्रश्नही आता जनमानसामध्ये पडायला लागले आहेत. तरी शेतकऱ्यांची लाईट नियमित चालू करून शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी विनंती ही शेतकरी करीत आहेत.