जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात वांग्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी संताप झाली असून बाजार समितीत वांगे विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात वांगे फेकून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अवकाळी पावसामुळे बाजार समितीत वांग्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून शेतकऱ्यांच्या वांग्यांना एका कॅरेटसाठी केवळ 40 रुपये भाव मिळत असून किलो प्रमाणे केवळ तीन ते चार रुपये वांग्यांना भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नाही आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात वांगे फेकून संताप व्यक्त केला आहे.