चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील दयानंद चौक अमरधाम रोड येथे मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात नगरसेवक रामचंद्र पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली असून पाटील यांनी नगरपालिकेत तात्काळ हे खड्डे बुजविण्याचे सांगितले. त्यानुसार (दि. 27) रोजी स्वतः या जागेवर थांबून मुरूम टाकून हे खड्डे बुजवून घेतले आहेत.
या खड्ड्यांमुळे अंत्ययात्रेच्या गाड्या देखील गचके खात जात असत म्हणजेच माणसाला मृत्यूनंतर देखील या खड्ड्यांचे धक्के सहन करत अमरधामची यात्रा करावी लागत असे ही गोष्ट चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शर्मा नगरसेवक रामचंद्रभाऊ जाधव यांच्या निदर्शनास आली असता रामचंद्र जाधव यांनी नगरपालिकेला तातडीने हे खड्डे बुजवण्याचे सांगितले होते.
यामुळे हा संपूर्ण चौक खड्डेमुक्त झाला असून उद्या अमरधाम पर्यंत व नवा पूल सदानंद हॉटेल पर्यंत संपूर्ण खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल असे देखील रामचंद्र जाधव यांनी सांगितले आहे हे खड्डे बुजवले गेल्यामुळे निदान आता मृत्यूनंतर तरी मृतदेहाची अमर धाम यात्रा सुखकर होईल म्हणूनच जिवंतपणी खड्ड्यांमध्ये वावरत असताना मृत्यूनंतर ही पाळी येऊ नये अशी असलेली माणसाची अपेक्षा पूर्ण होईल असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही.