जळगाव (प्रतिनिधी) भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न आधुनिक भारताचे तंत्रज्ञानाचे जनक स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज काँग्रेस भवनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गोरगरीब आणि गरजू लोकांना अन्नदान आणि मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित यावल रावेरचे लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी, खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील, माजी अध्यक्ष उदयदादा पाटील, जिल्हासरचिटणीस बापूसाहेब अजबराव पाटील, भंगाळे दादा, NSUI चे जिल्हाध्यक्ष देवेंद्रभाऊ मराठे, कॉंग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल, युवक काँग्रेस महानगरध्यक्ष परवेजभाई पठाण, शामभाऊ तायडे, बाबाभाई देशमुख, वराडे दादा, जाकीर बागवान आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.