जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असून यासाठी ना. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या पुढाकाराने उद्या मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. (Jalgaon Road News)
जळगावातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असून यामुळे जळगावकर अक्षरश: त्रस्त झालेले आहेत. यासाठी आधी आलेल्या निधीतून काही प्रमाणात कामे सुरू झालेली असली तरी ती पुरेशी नाहीत. आता खराब झालेल्या रस्त्यांना मोठा निधी लागणार आहे. यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने उद्या मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Gulabara Patil), आमदार राजूमामा भोळे (Rajumama Bhole)यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जळगावातील रस्त्यांसाठी या बैठकीत २०० कोटी रूपये इतका मोठा निधी मिळण्याची मागणी करण्यात येणार असून याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, हा निधी मिळाल्यास जळगावकरांची त्रासातून मुक्तता होणार आहे.