मेलबर्न (वृत्तसंस्था) ऑस्ट्रेलियासोबत तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती बीसीसी कडून देण्यात आली आहे. भारतीय संघातील खेळाडूंची तिसऱ्या कसोटी सामन्या आधी RT-PCR tests करण्यात आली होती. त्या चाचणीमध्ये भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत.
संपूर्ण भारतीय संघाचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील रेस्तराँमध्ये कोरोनासंबंधित नियमांचं उल्लंघन करताना दिसल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यामुळे भारतीय संघाला कोरोना संकटाचा सामना करावा लागतो का काय? अशी शंका निर्माण झाली होती. “३ जानेवारीला भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची करोना चाचणी करण्यात आली. सर्व चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,” अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.
न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी मेलबर्नमध्ये असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनीही बायो-बबलचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि पृथ्वी शॉ हे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यामुळे त्यांना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. बीसीसीआयने मात्र खेळाडूंनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनंतर या खेळाडूंची ३ जानेवारीला RT-PCR Test करण्यात आली आणि त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ सिडनीमध्ये दाखल होणार असून ७ जानेवारीला तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे.
कोरोनासंबंधित नियमांचा भंग केल्याचा आरोप रोहित, सलामीवीर शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फलंदाज पृथ्वी शॉ यांच्यावर आहे. या प्रकरणी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून चौकशी चालू असली तरी पाच खेळाडूंना संघासोबत प्रवासाला मनाई करण्यात आलेली नाही. नवदीप सिंग या चाहत्याने ‘ट्विटर’वर भारतीय संघातील पाच खेळाडूंसोबतची चित्रफित टाकल्यानंतर शनिवारी हा वाद निर्माण झाला. त्यानंतर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) साथीने संयुक्त चौकशी करीत असल्याचं घोषित केलं.