धरणगाव (प्रतिनिधी) : खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि हैदराबादकडे धावणाऱ्या ३ विशेष रेल्वे गाड्यांचे थांबे धरणगाव रेल्वे स्टेशनवर मंजूर झाले आहेत. या निर्णयामुळे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ होणार आहे. यासाठी खान्देश प्रवासी असोसिएशन आणि स्थानिक नागरिकांनी खासदार स्मिताताई वाघ यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
मंजूर झालेल्या गाड्या आणि वेळापत्रक:
वलसाड-दानापूर विशेष एक्सप्रेस (09025/26)09025: दर मंगळवारी दुपारी १:३४ वाजता धरणगाव येथून जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा आणि दानापूरकडे रवाना होईल.09026: दर बुधवारी दुपारी ४:३० वाजता धरणगाव येथून नंदुरबार आणि वलसाडकडे जाईल.
सुरुवात: २५ मार्च २०२५ पासून
बांद्रा-रेवा जनसाधारण विशेष एक्सप्रेस (09129/30)09129: दर शुक्रवारी दुपारी १:३४ वाजता धरणगाव येथून जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, कटनी, सतना आणि रेवाकडे रवाना होईल.09130: दर शनिवारी पहाटे ३:३२ वाजता धरणगाव येथून अंमळनेर, नंदुरबार आणि बांद्राकडे जाईल.सुरुवात: २८ मार्च २०२५ पासून.राजकोट-महबूबनगर विशेष एक्सप्रेस (09575/76)09575: दर मंगळवारी पहाटे ३:४२ वाजता धरणगाव येथून भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, काचीगुडा आणि महबूबनगरकडे रवाना होईल.09576: दर बुधवारी दुपारी ४:४२ वाजता धरणगाव येथून नंदुरबार, सुरत, अहमदाबाद आणि राजकोटकडे जाईल.सुरुवात: २५ मार्च २०२५ पासून.
खान्देश प्रवासी असोसिएशनचे आवाहन
खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेशदादा तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन यांच्यासह सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे आणि जतीन नगारिया यांनी सर्व प्रवाशांना या नवीन सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.स्थानिकांचा उत्साहया निर्णयामुळे धरणगाव परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे स्थानिकांनी नमूद केले असून, त्यांचे आभार मानले आहेत. ही नवीन थांबे प्रवास सुलभ करण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देणार आहेत.