रावेर (प्रतिनिधी) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण विरहित गावाची एकजूट महत्त्वाची असते. गावाच्या विकास कामे करण्याकरिता पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत न्यायमंदिर म्हणून काम करावे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शिरुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. चंद्रकांत पाटील हे होते.
यावेळी आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुकताईनगर – रावेर मतदार संघाचा विकास सुरू असून डीपीडीसीच्या माध्यमातून शिरुळला जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवाती ना.गुलाबराव पाटील व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री गुलाबराव पाटलांचे निरूळ वासियांना आश्वासन !
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हाणाले की, निरूळ गावाशी माझा ऋनानुबंधाचा संबंध आहे. गावाजवळील पुलाचे काम, गावांतर्गत काँक्रिटीकरण व सामाज मंदिर शासनाच्या मुलभूत योजनेतर्गत (२५१५) मधून मंजूर करणार असल्याचे आश्वासन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत गावाची असलेली एकजूट व लोकसहभागा बद्दल कौतुकही केले.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, अंबरनाथ माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, प्रमोद पाटील, कृ. ऊ. बा. चे सभापती सचिन पाटील, जि. प. चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील, भाजपचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, हिराभाऊ पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र लासुरकर, माजी सभापती सुरेश धनके, सरपंच मोनी ताई प्रमोद पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश नागराज पाटील, संचालक गणेश महाजन, तहसिलदार बंडू कापसे, शिवाजी पाटील, लक्ष्मणसिंग जाधव सर, पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मणसिंग जाधव सर यांनी केले तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.