भुसावळ (प्रतिनिधी) मनाेरंजन वाहिन्यांचं मायाजाल, समाजमाध्यमांचा वाढता वापर अशा नानाविध कारणांनी कुटुंबातील संवाद हरवला. ज्या घरात ज्येष्ठांचं वास्तव्य नाही ती घरे मुकी बनतात. अभिव्यक्त हाेण्यंाची प्रक्रीया थांबते. संवाद हाेत नसल्याने साचलपेपणा वाढताे. कालांतराने काैटुंबिक तणाव वाढत जाताे. अव्यक्त मने व्यक्त झाली तर ताणतणावावर मात करता येते, असे परखड मत वाशिमच्या लेखिका उज्ज्वला सुधीर माेरे यांनी व्यक्त केले.
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय पुष्पांजली अाॅनलाइन प्रबाेधनमाला घेण्यात आली. त्यात शनिवारी अंतिम पुष्प गुंफताना त्या बाेलत हाेत्या. ‘मुकी घरे बाेलकी करू या’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय हाेता. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती हाेती. संकटाच्या काळात, ताणतणावाच्या परिस्थितीत एकमेकांना धीर असायचा. हल्ली मात्र, कुटुंब विभक्त हाेण्याचे प्रमाण वाढले अाहे. नात्यांतील दुरावा वाढत चालला अाहे. घरात सकाळ-सायंकाळ एकत्र चर्चा करणं थांबलं आहे. दिवस-दिवसभर मुलांचा पालकांशी, पालकांचा मुलांशी संवाद हाेत नाही. दुरावणारी नाती जाेडण्यासाठी दिवसभरात किमान तीन ते चार वेळा पालकांचा मुलांशी भावनिक संवाद झाला पाहिजे. अर्थात, मुले-मुली आणि पालकात मैत्रीचं नातं प्रस्थापित झालं पाहिजे. एकत्र राहणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची काळजी घेणारं कुटुंब म्हणजे सुखी कुटुंब म्हणता येईल, अशा भावनभावना त्यांनी व्यक्त केल्या. सुत्रसंचालन प्रदीप साेनवणे यांनी केले. जळगावचे बांधकाम व्यावसायिक अजय बढे यांचे या सांस्कृतिक उपक्रमासाठी पाठबळ मिळाले. भालाेदचे अमाेल हरिभाऊ जावळे, समाजकार्य महाविद्यालय प्राचार्य प्रा. डॉ. उमेश वाणी, राेटरीचे सुधाकर सनांसे, मुंबईच्या स्टेपअप इंडियाच्या यती राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकल्पप्रमुख अमित चाैधरी, समन्वयक प्रा. श्याम दुसाने, सहसमन्वयक आर. डी. साेनवणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह आयाेजन समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
मायबापांना घराबाहेर काढू नका
शिक्षण म्हणजे साक्षर हाेणं नव्हे. लिहिता-वाचता आलं म्हणजे माणूस सुसंस्कृत झाला असे नाही. ताे समाजजिवनात व कुटुंबात कशा पद्धतीने वावरताे त्याच्यावर त्याची संस्कारांची पातळी ठरते. मायबाप ही संस्कारांची पाठशाळा आहे. त्यांचं घरात असणं हीच माेठी ऊर्जा असते. मात्र, वर्तमानात मायबापांना घराबाहेर काढणाऱ्या दिवट्यांचं प्रमाण वाढलं आहे. हे चित्र बदलवायचं असेल तर कुटुंबातील निकाेप संवाद वाढायला हवा, असा सल्लाही उज्ज्वला माेरे यांनी दिला.
वैश्विक कल्याणाची भावना ठेवा
स्वत:पुरतं जगणं म्हणजे जगणं नाही. वैश्विक कल्याणाच्या उद्देशाने काम करत राहण्याची शिकवण मुलांना दिली पाहिजेे. समाजात वावरताना दु:खाने पिचलेल्या माणसाला पाहून दु:खी हाेणं म्हणजे संवेदना जागरूक आहेत असं समजायला हवे. वाद हा वाळवीसारखा असताे. संपूर्ण घर ताे पाेखरून काढताे. ही वाळवी वाढू नये म्हणून संवाद हीच त्यावर खरी मात्रा आहे. संवादाच्या वेलीला सुसंवादाची पालवी फुटू द्या, असेही उज्ज्वला माेरे व्याख्यानात म्हणाल्या.